केजू देवी मंदिराच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ निर्णय घेत दुरुस्ती व चौथऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. आज मंदिर सुरक्षित आहे आणि भाविक निर्धास्तपणे दर्शन घेत आहेत.
पवना नदी स्वच्छतेसाठी विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात आली तसेच नदी परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमामुळे नदीचा परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक झाला आहे. निसर्ग संवर्धनाचा संदेश देत नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा हा एक सकारात्मक प्रयत्न ठरला आहे.
श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था, मर्या. थेरगाव, लक्ष्मीबाई महिला प्रतिष्ठाण व विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या वतीने १० वी व १२ वी माध्यमिक व उच्चमाध्यमिक परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी “विद्यार्थी गुणगौरव समारंभ” प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे आयोजित करण्यात आला, तसेच दहावीतील विद्यार्थ्यांसाठी “उत्तम गुणवत्तेसाठी योग्य दिशा” या विषयावर मार्गदर्शन सोहळा घेण्यात आला ज्यातून विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा मिळाली, तसेच महिलांच्या सशक्तीकरणासाठी राबवलेले हे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरले, महासंसदरत्न खासदार माननीय श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त मॅजिक ऑफ सीझर्स व युवासेना यांच्या वतीने आयोजित महिलांसाठी स्वयंरोजगार मेळावा हा स्वावलंबन व आर्थिक सक्षमतेकडे नेणारा स्तुत्य उपक्रम ठरला.
माय मराठीच्या समृद्ध लोककलेचा गौरव करणारा ‘Folk लोक’ - मराठी लोकसंगीताचा भव्य आणि रंगतदार सांस्कृतिक उत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. या उत्सवात महाराष्ट्राच्या विविध भागांतील पारंपरिक लोकसंगीत, लोकनृत्य आणि लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. आम्ही विविध प्रकारचे अनेक सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवत असतो. लोककलावंतांना एक व्यासपीठ मिळावे, तसेच नव्या पिढीला आपल्या मातृसंस्कृतीची ओळख व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
सम्राट मित्र मंडळ, थेरगाव यांच्या वतीने आयोजित थेरगाव प्रिमिअर लीग या भव्य क्रिकेट स्पर्धेची सुरुवात काल वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी येथे एक गाव, १६ संघ या संकल्पनेतून उत्साहात करण्यात आली, ही थेरगाव प्रिमियर लीग दरवर्षी आयोजित करण्यात येते. तसेच संसदरत्न खासदार माननीय श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार चषक या क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले, या स्पर्धांमुळे तरुण खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली तसेच क्रीडासंस्कृतीला चालना मिळाली आणि खेळाच्या माध्यमातून संघभावना, शिस्त व सामाजिक एकोपा वाढवण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.